Thursday, 2 January 2014

भारताचा अर्वाचीन इतिहास - भाग १

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातील सिंधू घाटी सभ्यता (हडप्पा आणि मोहनजोदडो)चे चित्रांमुळे मी खूप भारावून गेले होते असे अजून देखील आठवते. पुढे इतिहास हा विषय घेता आला नाही हे ही खरेच. पण मनात कुठे तरी याचा अभ्यास करावा, निदान आपल्या पुरते वाचन तरी करावे असे होतेच.

या नवीन वर्षातले हे एक उपक्रम आहे, एक निर्धार केला आहे, भारताच्या अर्वाचीन इतिहास संबंधी वाचन करण्याचा. 
    
भारताची सुरुवात कशी झाली, कसा होता मूळ भारत. युगायुगांतून भारतात झालेले बदल. वेगवेगळ्या काळातील  लोकांचे राहणीमान, चाली - रिती, समाजाची कल्पना काय असेल, या बद्दल उत्सुकता आहे. एखादा विषय अभ्यासक्रमातून शिकताना गोष्टी सोप्या होतात. नवनवीन माहिती पुरवणारा अध्यापक/ प्राध्यापक वर्ग आपणास मदत करतो. आता मात्र माझी उत्तरं मलाच  शोधायची  आहेत. 

 मला मिळालेले साहित्य प्रचुर मात्रेत असून मी माझ्या आवडीचा काही भाग मराठीत टिपून घेत आहे. ते मी ब्लॉगवर देत आहे.  ५००० वर्षा पूर्वीच्या मानवी जीवनाची नुसती कल्पना सुद्धा केवढी वेगळी वाटते.
भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे अभ्यास करण्याकरिता, काही विशिष्ट पद्धती वापराव्या लागणार आहेत. त्याची करणे अनेक आहेत.  आमचे केवढे दुर्दैव म्हणावे कि एवढे प्राचीन राष्ट्र/संस्कृती असून ऐतिहासिक गोष्टी आणि त्या संबंधी चे लिखाणा बाबतीत केवढी उदासीनता होती.  असे म्हणतात कि मध्य युगातील अनेक भारतीय राजे शिक्षण आणि साहित्या बाबतीत युरोपातील समकालीन  राजां पेक्षा कितीतरी पटीने उजवे होते.  एक उदाहरण, साधारण  ६०० - ६४० इसवी या काळातील उत्तर भारतातील सम्राट हर्षवर्धन. त्याच्या काळात उत्तर भारताचे चीनशी राजकीय पातळीवर संबंध होते पण तरी देखील या सर्व गोष्टींचे लिखाण करून जतन करावे याची जाणीव नव्हती. दरबारातील गायक मौखिक रीतीने सारे जतन करित होते पण ऐतिहासिक बारकाव्यांचे दस्तावेज नसल्याने योग्य जतन होऊ शकले नाही.  इतिहासात नोंद फक्त कलहना लिखित 'राजतरंगिनी ' ची आहे. राजतरंगिनी, संस्कृत मध्ये बाराव्या शतकात लिहिलेली असून, यात काश्मीरच्या इतिहासाचे, राज्य परंपरांचे, राजाला मध्य स्थानी ठेवून केलेले वर्णन आहे. इतिहासकार रॉबिन आर्थर डोकीनच्या मते कलहना शिवाय या आधी कोणी भारतीयाने केलेले इतिहासाचे लिखाण कुठेही सापडत नाही. कालबद्ध असे हे पहिले पुरातन साहित्य आहे.  'राजतरांगिनी' हे काव्य स्वरूपात असून त्याकाळातील संस्कृत मध्ये आहे, तेंव्हा प्रत्येक गोष्टीचा स्पष्ट असा उलगडा होत नाही. काही शब्दांचे द्वी अर्थ निघतात, जे गोंधळात भर घालतात. यालाच धरून मार्क स्तेइन हा पुरातत्वेत्ता, म्हणतो "the very redundant praise and flattery which by custom and literary tradition Indian authors feel obliged to bestow on their patrons".  खऱ्या तथ्यावर किती पुटे चढली कोण जाणे. 

पण उर्वरित भारताबद्दल, कलहनाच्या जोडीचे काहीही सापडत नाही अगदी मुस्लिम साम्राज्य येईस्तोवर. बरे पुराणा बद्दल ही तेच, लिखित स्वरूपात आढळत नाही. लेखीस्वरूपातील दस्तावेज आणि पुरातत्व विज्ञानच्या उपयोगातून मिळालेले आलेख यांच्यामुळे गोष्टींना दुजोरा मिळतो आणि इतिहासातील कोडे उलगडत जाते. लेखी पुरावे न सापडत असल्यामुळे  आम्हाला पुरातत्वविज्ञान  वर अवलंबून राहायला हवे. राजा विक्रमादित्य खरच होता का, या बद्दलही ठोस असे पुरावे अजून मिळालेले नाही.  तसेच जे काही पुरावे पुरातत्व विभागाला सापडले आहे, त्यांची सांगड माहित असलेल्या राजवंशाच्या यादीशी होत नाही,  कालखंड माहिती यातही तफावत जाणवते,  काही कथा काल्पनिक ही आहेत.

ग्रीक किंवा रोम सारखी गुलामगिरीची प्रथा भारतात कधी ही नव्हती. आशियाचा आभ्यास करताना चीन आणि भारताचे  वर्चस्व प्रामुख्याने दिसते पण चीन कडे १००० ई. पू. पासूनची व्यवस्थित माहिती आहे,  ही माहिती  ऐतिहासिक कागदपत्रातून,  कुटुंब नोंदणी,  न्यायालयीन नोंदणी,  नाणी,  शिलालेख  इत्यादीतून स्पष्ट होते, तसे मात्र भारताबद्दल नाही.

अति प्राचीन भारत कसा होता? लहान वसाहती, त्यांचे व्यवहार, शेती, हस्तकला आणि श्रमाची विभागणी कशा पद्धतीने व्हायची? या वसाहतीत लोखंड आणि मीठ कुठून यायचे? भारतातील मध्यमवर्गाचा उदय कधी, केंव्हा आणि कसा झाला? नारळ सारख्या वस्तूंचा व्यापार कसा सुरु झाला? आज देखील अस्तिवात असलेल्या काही प्रथांचे मूळ काय? अश्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे हळू हळू सापडतील.

 इतिहासाचा विचार काळा प्रमाणे आणि झालेल्या प्रगतीवरून केलेला आहे.

या अभ्यासासाठी अनेक संदर्भ (references ) लक्षात घेत असून सर्वांची यादी शेवटच्या भागात देईन. 

Monday, 30 December 2013

मध्यमवर्गाची श्रीमंती!


आज मध्यमवर्गाच्या हातात चांगलाच पैसा आलेला आहे,  कुटुंब लहान होत आहे त्यामुळे मिळकत आणि खर्च याची सांगड सोपी झाली आहे. निदान बाजारात, मॉलमध्ये, आणि हॉटेल मधील गर्दी तरी हेच दाखविते.  इतरांशी तुलना करण्यापेक्षा व्यक्तीची तुलना त्याच्या आधीच्या दोन पिढ्यानशी केली तरी हेच दिसते. आता प्रश्न असा कि ही श्रीमंती वागण्यातून पण जाणवते का?

जरा विचार करू
  •   हल्ली बरेच लोक मॉल मध्ये खरेदी करतात. उंची कपडे आणि branded वस्तूंचे चाहते वाढत आहेत. पण यातील लोक जेंव्हा भाजी बाजारात जातात  (offcourse जर गरज लागली तर), तेंव्हा भाजी वाला/वालीशी ते दरासाठी वाद घालताना ही दिसतात.  थोडक्यात  multiplex मध्ये १०० - १५० रुपयात popcorn घेणारी मंडळी रस्त्यावरील भाजी वाला/वाली कडून २० रुपयाचे कणीस १८  करून घेताना दिसतात. 
  • जत्रेत १० रुपयाला मिळणारे खेळणे ९ रुपयाला मिळावे म्हणून अर्धा-अर्धा तास हुज्जत घालणारे पण आहेत.
  •  स्वतःच्या बढतीवर बारीक लक्ष ठेवणार पण घरात नोकर ठेवताना पगार/सुट्टी/बोनस यावर चर्चा करून शक्य असेल तेवढी तडजोड करण्याचे प्रयत्न करतात.  
  • आपल्याकडे आठवड्यातील कामाचे दिवस ६ पण म्हणून हाच नियम कामवाली बाईला लागू पडतो का? 
  • देवळात देणगी देणारे आणि भटाला अव्वाच्या सव्वा दक्षिणा देणारे पण वाढले आहे, यातील किती जण  स्वतःच्या आई वडिलांचा विचार करतात?
  •  भारतात उच्चशिक्षण महाग आहे, ते घेताना बरेच जण पालकांनकडून मदत घेतात. शिक्षण घेवून, नोकऱ्या स्वीकारून, कितीजण स्वतःचे राहणीमान सुधारण्या बरोबर आई वडिलांचे पैसे फेडण्याचा प्रयत्न करतात. 
  • पालक पैसे मागत नसले तरी ही पुढच्या पिढीची जवाबदारी नाही आहे का?
  • म्हातारपणी आपल्या भोवती माणसे हवी असे वाटणे साहजिक आहे तरी गाठीशी पुरेसे पैसे असणे  आणि ती खर्च करण्याची इच्छा जिवंत राहणे ही म्हत्वाचे आहे.
  • आई वडिलांचा वापर मुले संभाळण्यासाठी करणारे पण वाढत आहेत. भारतात आणि काहीतर वेळ पडली तर त्यांना परदेशीपण नेतात. बरे यात terms and conditions पुढच्या पिढीच्या असतात.
  • घेतलेले उच्चशिक्षण जर स्वतःचा संसार चालविण्यास अपुरे असेल तर अश्यावेळीस कमी शिकलेली मंडळी बरी. बरे येथे अपुरे म्हणणे हे तुलनात्मक आहे, पैसे अपुरे पडतात कारण बहुतेकवेळी गरजेपेक्षा अधिकची हाव असते. 
  • निवृत्त झालेल्यांना नवीन जवाबदाऱ्या देणे योग्य वाटते का?
  • स्वतःची वास्तू उभी करताना, काही वेळा मुले ह्यात असलेल्या आई वडिलांच्या घराबद्दल निर्णय घेवून टाकतात आणि मग "तू तिथे मी ना होता" मुले ठरवतील तसे राहण्याची वेळ म्हाताऱ्यान वर येते.
  • पुस्तके विकत घेणे वाढले आहे पण म्हणून वागणे बदलले असे म्हणता येईल का? वाचनामुळे सुसंस्कृत व्हायले हवे, ते प्रमाण दिसते का? कि पुस्तके निव्वळ सजावटीच्या वस्तू होत आहेत. 
  • आपले जुने कपडे देताना पण अपेक्षा असते कि समोरच्याने त्याची जाणीव ठेवावी. म्हणजे दान पण गाजा वाजा करून द्यायचे. "उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला ही कळू नये " या परंपरेतले आपण, खरेच बदलत आहोत.
थोडक्यात श्रीमंती वाढली कि भपकेबाजी याची गफ़ल्लत होत आहे. माणसाचे राहणीमान आणि वैचारिक उंची एकत्र वाढली तर समाजाची उन्नती होते. भिन्नवर्ग एकमेकांस पूरक हवे. वेगवेगळ्या स्तरांतील अंतर कमीतकमी व्हायला पाहिजे. नाहीतर  मिळणाऱ्या श्रीमंती बरोबर असुरक्षितता पण वाढते आणि निखळ आनंद घेणे कोणासही दुरापास्त होते.

 "There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich" - Marlene Dietrich
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99

There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99

Thursday, 26 December 2013

बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!

सबंध जगात वेगवेगळ्या देशांत, प्रांतात, गावांत वेगवेगळ्या community traditions, स्थानिक परंपरा असतात. काही वेळा त्या धार्मिक स्वरूपाच्या असतात आणि काही वेगवेगळ्या प्रसंगी सुरु होतात आणि पुढे चालू राहतात. धार्मिक, जसे सणानिमित्त जत्रा आणि इतर परंपरा, जसे दिवाळीच्या वेळीस लहान मुलांचे किल्ले   किंवा पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरला  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लागणारी जिलेबीची दुकाने.

 नॉर्वेच्या बर्गन (Bergen ) या गावी, नाताळच्या काळात गावाची छोटी प्रतिकृती करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात
१९९१ साली झाली. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि मग स्थानिक नगरपालिकेच्या पुढाकाराने ती एक परंपराच झाली.

याचे वैशिष्ट म्हणजे सर्व आकृत्या ginger bread cookies ( सुंठ घालून केलेली बिस्किटे ) ने तयार करतात. यात घरे, शाळा, गाड्या, दुकाने, बाजार, बोटी, जनावरे आणि खूप काही असते. बिस्कीटाची आकृती तयार करून त्यावर पिठी साखर आणि रंगीत गोळ्यांनी ती सजवितात. स्थानिक नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. परिसरातील बालवाड्या, शाळा, संस्था आणि हजारहून अधिक कुटुंबेयात सहभागी होतात.
 हे जगातले सर्वात मोठे आणि वैशिष्टपूर्ण असे बिस्किटांचे  गाव आहे. या वर्षी यात १९००  इमारती आणि आगगाड्या असून ३८० चौ. मी. क्षेत्रात हे वसविले आहे. प्रत्येक वस्तू ही आपल्यात कलात्मक आहे.या प्रकल्पात अगदी ३ - ४ वर्षांच्या चिमुरड्यान पासून ते पंचात्तरी  ओलांडलेले आजी-आजोबा पण सहभाग घेतात.





अश्याच पद्धतीचे गाव न्यूयॉर्क येथे ही तयार करण्यात आले आहे.  त्याची नोंद गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. ते गाव एका व्यावसायिक आचाऱ्याने तयार केले असून ते संपूर्ण खाणे योग्य आहे. तसेच  सर्व बिस्कीटे एकच पाककृती ने तयार केलेली आहेत. ते गाव गिनीस बुकसाठी लागणारी नियमावली डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. याच्या उलट बेर्गेन येथील गाव लोक सहभागातून तयार झाले आहे.


वरील फोटो pepperkakebyen च्या फेसबुकच्या पानावरून घेतलेले आहे.  
सर्व हक्क लेखकाकडे. ब्लॉग ऍग्रीगेटर वगळता येथील मजकूर कुठेही (ब्लॉग, फेसबुक वॉल) प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखांविषयी इतरांना सांगायचे असेल तर कृपया ब्लॉगचा दुवा द्यावा. - See more at: http://rbk137.blogspot.no/#sthash.Jb5n5gjH.dpuf

Tuesday, 24 December 2013

Library/ ग्रंथालय/ वाचनालय!

 येथे आल्यापासून आणि वेगवेगळ्या गावांतील public library बघून बरेच दिवस यावर काही लिहावे असे मनात होते पण जमत नव्हते.   २३ डिसेंबर २०१३ ला  ''सकाळ " मध्ये "झोपडपट्टीतील मुलांसाठी फिरते ग्रंथालय" हा लेख वाचला आणि मग सगळे सुचत गेले. वाचनाचा छंद असलेल्या गरीब मुलांना तो जोपासता यावा म्हणून एका महाविद्यालयातील मुले हा अभिनव उपक्रम येत्या वर्षा पासून सुरु करीत आहेत. उत्तम कल्पना आहे. मुलांना मिळणारा आनंद आणि त्याचे फायदे मोजण्या पलीकडील आहेत.  हा उपक्रम एका विशिष्ट वर्गातील मुलांसाठी आहे. ठीक. आता मुद्दा आहे इतर वर्गातील मुलांचा.

 पूर्वी उन्हाळी सुट्टीत, दोन महिने मुलांना मस्त वेळ असायचा. फार तर आजोळी जाणे  पण कुठे ही असले तरी, वाचनालयाचे सभासद होणे आणि मन मुराद गोष्टीची पुस्तके वाचणे असे प्रघात असायचे. मग या पुस्तकांची अदलाबदल होणे हे ओघाने आलेच. पुस्तके विकत घेणे किंवा भेट मिळणे याला एक मर्यादा होती. आणि हो एकत्र कुटुंब पद्धती मध्ये कुठल्या तरी मोठ्याला वाचनाची आवड असायची आणि मग बच्चे कंपनी खूष. परत हि मोठी व्यक्ती घरात नाही तर शेजारी-पाजारी असायची. थोडक्यात जवळपासच्या सर्व मुलांचे कल्याण.

 आता चित्र खूप वेगळे आहे, उन्हाळी सुट्टी म्हणजे सहली आणि त्याहून वेळ मिळाला तर शिबिरे किंवा छंद वर्ग. पुस्तके विकत घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. मुद्दा असा कि आपण किती ही पुस्तके विकत घेतली तरी घरीच वाचनालय होवू शकते का? दुसरे आता बऱ्याच ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धत, मुलांना वेळ कोण देणार आणि वाचनाचे संस्कार कोण करणार. ढिगाने पुस्तके आणून दिली तरी ती वाचली जाणार याची खात्री काय? ती नुस्तीच शोभेसाठी किंवा status symbol साठी नाही हे कसे समजणार?

दोन उदाहरणे,

शाळेत कोणा एका इयत्तेत  असताना वर्ग शिक्षिका असणाऱ्या बाईंनी सांगितले  की डायरी म्हणजेच रोजनिशी लिहा. खूप फायदे ही सांगितले मग काय जो तो डायरी लिहू लागला.  बरे आठवड्या नंतर त्याच बाईंनी सर्वांना आपली रोजनिशी आणावयास सांगितली. झाले मग काय, ज्यांनी लिहिली नव्हती त्यांनी एका दिवसांत ती पूर्ण केली. मागे कोण राहणार.  गंमत म्हणजे सर्वांची रोजनिशी तशी सारखीच होती, साचेबद्ध (routine) आयुष्य असल्या मुळे त्यात नवीन असणार तरी काय होते. त्यात काही प्रमाणात वाक्ये ही सारखीच होती.

तशीच दुसरी एक आठवण शाळेत शिक्षिका असलेल्या मैत्रिणीने सांगितलेली. शाळेतील मुलांचे निबंध साधारण पण  सारखेच असतात. असे कसे? उत्तर सोपे आहे,  शाळा एकच आणि शाळे नंतर क्लास पण सारखेच.  बरे क्लास सारखे नसले तरी शिक्षक वापरणार ती पुस्तके सारखीच. अगदी निबंधाचे पुस्तक पण. परीक्षेची तयारी म्हणजे निबंध पाठ करणे, ते ही म्हणी सकट. मग तर झाले.

आपण स्वतःला एक प्रश्न विचारू,  आपण शेवटचे ग्रंथालयात कधी गेलो होतो? आपल्याकडे आई - वडील  मुलां सोबत लायब्ररीत जातात का? आई - वडील मुलांसाठी bedtime stories वाचतात का किंवा इतर वेळेस तरी ते एकत्र पुस्तके वाचतात का? मुलांवर अश्या प्रकारे संस्कार होतात का? वाचनामुळे मुलांची कल्पनाशक्ती प्रगल्भ होते,  याची पालकांना जाणीव असते का?  एका प्रसंगाला पुस्तक भेट दिले की झाले, एवढ्यावर थांबणे बरोबर आहे का?

Albert Einstein चे एक छान वाक्य आहे,
Imagination is more important than knowledge.

मुले जेंव्हा टिव्ही किंवा सिनेमा बघतात तेंव्हा सर्व काही घडत असते. त्याच्या उलट पुस्तक वाचताना मुले शब्द - वाक्य वाचून कथेचे विश्व रंगवतात. ते कथानकात गुंततात, त्यातील भाग होतात. टिव्ही - सिनेमातील नाटकीपण तेथे नसते. उलट त्यांची भाषा आणि विचारशक्ती समृद्ध होते. मुले बुद्धिमान होण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचायची गोडी लावणे आणि ती आवड जोपासण्यास मदत करणे.   

Sunday, 22 December 2013

आरंभशूर

 रोजच्या एकसुरी आयुष्यात नाविण्य आणण्यासाठी आपण छंद जोपासतो. मित्र - मैत्रीण, परिवार, ग्रुप मध्ये चर्चा होते आणि मग छंदाला सुरुवात. एकदम जोर शोर से.
यात प्रामुख्याने  आलेले छंद म्हणजे,  व्यायाम - सकाळ/संध्याकाळ फिरायला जाणे, पुस्तक वाचन ( धार्मिक ग्रंथ पण आले ),  … यात आता ब्लॉग लिहिण्या (blogging) ची भर पडली आहे.
 सुरुवात होते  पण  सातत्य राहते का?
बहिणाबाई म्हणतात …
'मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्या रे लाटा'

मग आज इधर और कल उधर. आज एक छंद उद्या दुसरा.

 मी  analyst आहे हा काही माझा दोष नव्हे तेंव्हा माहिती हातात आली की त्याचे आकलन (analyse)  होणे हे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर आदत से मजबूर.  बहिणाबाई परत असे ही म्हणतात…
'मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर '

शेवटी मी  analysis करायचे ठरविले. एक लक्षात असू देत कि statistical  analyst ला एका unit/item मध्ये रस नसतो. तो संपूर्ण गटाचा अभ्यास करतो. मी तेच केले.

साधारणपणे  ४०० मराठी ब्लॉग्सचे अवलोकन केल्या वर असे दिसते कि
  •  साधारण पणे १० ब्लॉग्स पैकी ४ ब्लॉग्स 'कविता, कथा, सिनेमा, करमणूक (entertainment)चे, १  खाणे/पिणे/पदार्थ करणेची माहिती विषयी, १ technology, १ चालू घडामोडी विषयी, १ फालतू आणि २ इतर विषयीचे असतात.
  •  सातत्य न राखणारे किंवा राखू न शकणारे, साधारणपणे  ५ posts मधेच गारद होतात.
  • आणखीन एक म्हणजे एका व्यक्तीने अनेक blog सुरु केले तर सातत्य राखणे कठीण असते किंवा हातात खूप वेळ हवा. नाहीतर लोकांचा कल एका विशिष्ट blog कडेच राहतो.
  • चालू न शकणारे काही personal blogs  आहेत किंवा होते, जे देशातील- विदेशातील बातम्या (चालू घडामोडी ) देतात. एवढी online मोफत वृतपत्रे मिळत असताना कोणी blog  का वाचेल?
  • तुरळक वेळा एकच post एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या blog वर दिसते. 
  •  बरेच ब्लॉग्स जाहिरातींनी भरले आहेत.  
  • साहित्य क्षेत्राशी निगडीत लोकांना ब्लॉग्सचा विशेष फायदा होताना दिसतो.
  • तसेच आपल्या productची अप्रत्यक्षपणे जाहिरात करणारे पण आहेत.
 एवढा सगळा अभ्यासकरून मला काय करू नये एवढे मात्र समजले. आणि जे मला आवर्जून टाळायला आवडेल ते म्हणजे ब्लॉग वरून "पैसा मिळविणे ".












Thursday, 19 December 2013

नावात काय आहे?

 हल्लीच माझी एक सहकारीण निवृत्त झाली. ४५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्ती. निरोप समारंभ आधी कोणीतरी विचारले, काय कसे वाटते आहे. ती अतिशय शांतपणे  म्हणाली, " it is just like going to your own funeral ". लोक तुमच्या बद्दल चांगलेच बोलतात, जुन्या आठवणी काढतात आणि मागील गमती जमती आठवतात. शेवटी चांगले खाणे- पिणे.
या बाईं विषयी थोडे.
ही बाई गावांत राहत नसून, थोड्या अंतरावरील एका island वर शेतात राहते. तिच्या कडे एक मोठे कुत्रे असून, ती रोज पहाटे ३:३० च्या दरम्यान त्याला फिरायला नेते. ऑफिसला पहाटे सव्वा पाच वाजता हजर असायची. अनेक दशकांची सवय असे समजले. ऑफिस मध्ये एकही व्यक्ती नाही जिला या बाईनी मदत केली नसेल. कायम हसतमुख आणि उत्साही. सकाळी ऑफिसात अलार्म बंद करण्यापासून कामाची सुरुवात.

William  Shakespeare म्हणतो

What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.

यात तत्थ्य वाटते का? जर असे नसेल तर माणसे, आपले  किंवा आपल्या आप्तांचे नाव प्रसिद्ध वहावे म्हणून कां झगडत असतात. शैक्षणिक/सांस्कृतिक/क्रीडा संस्था, बाजार समिती, रस्ते, मैदान, वसाहती असो किंवा या तत्सम असे काही ज्याला नाव देणे शक्य आहे. सार्वजनिक निधीतून किंवा एका पद सोबत मिळणाऱ्या निधीतून काम केले किंवा काही उभारले तर त्याला नाव देण्यात केवढा आटापिटा, वाद होतो आणि काही वेळा प्रकरण मारामारी पर्यंत जाते. कशा साठी हा एवढा अट्टाहास?

वरील सर्व लिहायचे कारण, संस्थामध्ये असणाऱ्या meeting rooms ना शक्यतो नंबर किंवा नावे असतात. नावे शक्यतो त्या संस्थेशी निगडीत प्रसिद्ध व्यक्तींची असतात. मध्यंतरी माझ्या संस्थेत एक नवीन मीटिंग रूम बांधण्यात आले. साहजिक त्या रूमला नाव काय द्यावे याची चर्चा झाली आणि शेवटी सर्वानुमते असे ठरले कि त्या रूमला या बाईंचे नाव द्यावे.  ४५ वर्षे निश्चल मनाने काम केले त्याची पावती.

ज्या दिवशी मला हे समजले मी केवढी भारावून गेले म्हणून सांगू. राहून राहून मी विचार करत होते कि आपल्याकडे हे शक्य आहे का? कश्यास ही नाव देणे हे ही निव्वळ राजकारण असते हे आपण जाणतो. तेंव्हा आपल्याकडे असलेल्या  heirachy मुळे, एका मीटिंग रूम ला एका receptionist चे नाव दिले जाऊ शकते का?
काम किती ही वर्षे आणि कसे ही केले म्हणून काय झाले. अशी कृतज्ञता आपल्या कडे शक्य आहे का?

"We are all equal" हे  वाक्य अनेक सुविचारा सोबत शाळेच्या भिंती पर्यंतच सीमित असते.
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99

Tuesday, 17 December 2013

स्त्रीचे (बाईचे ) खरे घर कोणते?

भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीत खूप भिन्नता आहे आणि त्याची सुरवात होते घरा पासून.

पाश्चात्य संस्कृतीची झलक दाखवणारी  दोन उदाहरणं, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची प्रसिद्ध लेखिका, Jane Austin  किंव्हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीची लेखिका Lucy Maud Montgomery. Jane इंग्रज तर Lucy ही कॅनेडिअन. दोघींच्या कादंबरीत मुख्य पात्र शक्यतो स्त्री. त्याकाळातील स्त्री आणि तिच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा. अनेक कथानकात साधारणपणे…

मुलीचे लग्न ठरले कि मग तिचा होणारा नवरा, श्रीमंत असो वा गरीब,  तिला तिच्या घरा बद्दलच्या अपेक्षा विचारतो. त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर घेतो. कुलीन किंव्हा श्रीमंत असेल तर काही सांगायला नको. तो तिला घरात हवे तसे बदल  करून घेण्यास सांगतो.  बरे जर तो मध्यम किंव्हा श्रमिक वर्गाचा असेल तरी देखील त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर बघतो.  अश्या वेळेस त्याचे आणि तिचे नातलग आणि त्यांचा मित्र परिवार त्यांना घर लावण्यास मदत करतात.

 लग्नानंतर स्त्री 'त्याच्या आणि तिच्या' घरी जाते. घर लावते. स्वतःच्या संसारात हळू हळू सर्व शिकते आणि रुळते. ते दोघे मिळून आपला संसार लावतात, तो पुढे चालवतात. तिचे आणि त्याच्या घरचे त्यांना मदतीस येतात पण तात्पुरते. स्त्री जवाबदार होते. आपली मुले आणि संसार ती आपल्या पद्धतीने करते. १०० आणि २०० वर्षा पूर्वीच्या काळात अतिशय गरज असल्याशिवाय स्त्रीचे बाहेर काम करणे सहसा दिसत नाही. कथां मधून शेतात किंव्हा व्यवसायात मदत करणारी स्त्री दिसते पण मुख्यतो घराची जवाबदारी स्त्रीची आणि बाहेरची पुरुषाची. असेच दिसते आणि मुख्य म्हणजे तिचे स्वातंत्र जोपासले जाते.

 या गोष्टी १०० - २०० वर्ष पूर्वीच्या. पुढे तर तिला अजून शिक्षण मिळाले आणि समाजात बळकट स्थानपण.

याच्या उलट आपल्याकडे, लग्न होउन मुलगी सासरी जाते. बाहेरगावची नोकरी सोडली तर मोठ्या प्रमाणात मुली सासरीच जातात. ते घर 'सासर' असते. त्या घरातील ज्येष्ठ  व्यक्ती तिला काही सांगताना 'आमच्याकडे' असे असते, इथूनच सुरवात करते. एकत्र कुटुंबात राहताना, तिचा संसार कुठे सुरु होतो? वेगळे व्हायचा अर्थ किंवा स्वतःचा संसार लावणार म्हणजे 'घर मोडणार'. परत काही वेळा नाफातोट्याचा विचार होतो आणि विभक्त होणे टाळले जाते. घरातील जेष्ठ निवृत्त झाले कि कुटुंबाची धुरा पुढच्या पिढी कडे येते. लक्षात घ्या कुटुंबाची धुरा. मग ती कुटुंब सांभाळते, तो तिचा संसार नसतो, ती फक्त आपली 'position ' सांभाळते. वयाची पन्नाशी जवळ आल्यावर संसारची हौस तरी अशी काय राहणार. बहुतेक वेळा, जवाबदारी पारपाडणे म्हणजे 'संसार'. स्त्रीचे स्वातंत्र जपले जात नाही. मग ती लहान असो व मोठी. अश्यावेळी जी पिढी सोशिक असते ती सोसते. घर फुटू नये च्या नावा खाली एक प्रकारचे शोषण चालते. काही वेळा मध्यमवयीन स्त्रीला स्वातंत्र हवे असते, मुले जरा मोठी झाली कि ती आपल्या आवडी निवडी जोपासू पाहते. यात काही यशस्वी पण होतात, पण त्या वेळी सुद्धा अपराधीपणाची जाणीव येत नाही असे ही नाही. 

जिथे नवीन संसार मांडला जातो तिथे काही प्रमाणत स्वातंत्र असते आणि अश्यावेळी त्याच्या किंवा तिच्या घरची मंडळी एका मर्यादे पर्यंत राहिली तर नाती छान सांभाळली जातात. ती आणि तो एकमेकाच्या मदतीने बहरतात.
म्हणतात ना!
घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती